Posts

Showing posts from July, 2022

लेखांक तेरावा : 'छडी लागे छमछम'

Image
घराचं अंदाजपत्रक बनवताना, हातातोंडाशी आलेला घास जाताना पाहून मला सापशिडीच्या त्या खेळाची सदैव आठवण येते. सरळ मार्गाने जाताना इतके अडथळे, इतर खेळगडी शिडयांच्या सहाय्याने झपाझप वर जात असतात. ते आणखी डिप्रेशन देणारं... अशावेळी एखादा कर्मधर्म संयोगानं सुटला तर आपण हळहळतो. भर गर्दीत आपल्याबरोबरीचा ट्रेनमध्ये चढतो आणि पुढे जातो, आपण किती सुटल्या याची गणितं मांडत बसतो.  या सर्वांतून सगळेजण जात असतात. आपल्यापेक्षा दुसरा सुखी असं प्रत्येकाला वाटतं. मनुष्यप्रवृत्ती आहे ही ! मध्यंतरी TV वर 'सोच बदलो' असं सांगणारी एक जाहिरात यायची. खरंच self talk बदलला तर किती सकारात्मक बदल घडून येतील. त्याचा तुमच्या व्यक्तिमत्वाबर, कुटुंबावर नातेसंबंधावर किती सुंदर परिणाम होईल.  पूर्वी टीव्हीवर म्हणजे दूरदर्शनवर 'संस्कार' नावाची एक साप्ताहिक मालिका होती. त्याचे श्रीधर फडके यांच्या आवाजातले संस्कारावरचे गाणे आजही मला ताल धरायला लावते. मुंबईतल्या एका 'कुणाचाही पायपोस कुणाच्या पायात नाही' असे वातावरण असलेल्या शाळेत नवीन मुख्याध्यापक म्हणून मोहन जोशी येतात.  'छडी लागे छमछम' असा ठाम विश...

लेखांक बारावा : “गुजरा हुआ जमाना आता नहीं दुबारा”

Image
“गुजरा हुआ जमाना आता नहीं दुबारा”. . . जुन्या काळातील हे गाणं ऐकून कातरवेळी अस्वस्थ व्हायला होतं. जीवनात वेळेला फार महत्व आहे, म्हणून इंग्रजीत 'Time is money' असं म्हटलं जातं. लोकसंख्येच्या भूभागाच्या दृष्टीने आपण अग्रेसर आहोत. नैसर्गिक विविधता आहे. लोकांमध्येही वैविध्य आहे. जगात अशी रंगांची सरमिसळ असलेला तरीही संस्कृती टिकवून ठेवणारा दुसरा देश नाही. परंतु वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की अजूनही म्हणावा तितका विकास, समृध्दी दिसत नाही. पूर्वी म्हणे 'सोन्याचा धूर' निघायचा तो काळ वेगळा होता. वास्तवात आपल्या सगळयांभोवती धूर आणि धुकं भारुन  राहिलंय....  बौध्दयांक चांगला आहे. कर्तृत्ववान माणसं आहेत. तरीदेखील दारिद्रयरेषेखालील जनता पाहिली की मन सैरभैर होतं. कोकणात पाऊस झोडपून काढतो, नद्या तुडुंब वाहतात, नियोजनाअभावी पाणी समुद्राला मिळते आणि कोकणचा कॅलिफोर्निया' होण्याचं स्वप्न 'माकडाच्या घरा' सारखं अधुरं राहतं.  आर्थिक नियोजन करताना फार बारकाईने विचार करावा लागतो. कोणत्याही देशाच्या भौतिक गरजा अत्यंत महत्त्वाच्या आहेत पण त्यानंतर अध्यात्मिक विकासाकडे वाटचाल व्हायला हवी....