Posts

Showing posts from October, 2022

लेखांक २० : चांगल्या गोष्टींचे लाभ घ्यायचे बाजूला राहतात

Image
  गल्लीबोळात ब्युटीपार्लर्स आढळतात तशीच अवस्था जवळजवळ बॅकांच्याबाबतीत आढळते सरकारने बँकांचा प्रसार देशात सर्वत्र केलेला आहे. व्यक्तीजवळील रोकड ही घरात ठेवणे सुरक्षित नसल्याने ती बँकेत ठेवल्यास त्यावर व्याज मिळते आणि सुरक्षितता हा दुहेरी फायदा होतो. बॅका अशा स्वरुपाच्या रक्कमांवर कर्ज देऊन देशाच्या विकास कार्याला हातभार लावू शकतात. रिझर्व्ह बॅक ऑफ इंडिया ही भारतातील मध्यवर्ती बॅक आहे. रिझर्व्ह बँक काही धोरणं ठरवते आणि त्यानुसार देशातील सर्व बँका त्यांची व्यवहारशैली ठेवतात.  बॅकेशी बहुतांश लोकांचा संबंध येतोच येतो. विहीत नमुन्यातील प्रवेशिका भरल्यास योग्य त्या अटी पूर्ण केल्या की कोणतीही व्यक्ती बॅकेची खातेदार होऊ शकते. प्रत्येक राज्यात 'त्रिसुत्री भाषा' असल्याने बॅकेचे विविध फॉर्मस्, पेपर्स इंग्रजी, हिंदी आणि त्याचबरोबर प्रादेशिक भाषा यांनी युक्त असतात तशी शासनाची सक्ती आहे. त्यामुळे बॅका म्हणजे काहीतरी वेगळं मनात धडकी भरवणारं प्रकरण अशी समजूत अशिक्षित, अल्पशिक्षित व्यक्तींची होऊ शकते. आपल्या डोक्यात उगाचच खुळखुळा वाजत राहतो आणि चांगल्या गोष्टींचे लाभ घ्यायचे बाजूला राहतात आणि ...

लेखांक एकोणीसावा : भविष्यकाळातील गरज भागवता यावी यासाठी लोक सोने खरेदी करुन ठेवतात.

Image
विकसनशील देशात सोन्याबद्दल विविध मतमतांतरे आढळतात . सोने खरेदी ही बहुतांश त्या देशातील नागरिकांच्या मानसिकतेवर अवलंबून असते. सोने बाळगण्याच्या बाबतीत लोकांची मानसिकता कशी असते की सामान्य माणसाला अडचणीच्यावेळी पैसा उभा करण्याचा मार्ग म्हणजे घरातील सोने ! ही अडचण म्हणजे घरातील मोठं आजारपण, उच्च शिक्षण, कर्जाची परतफेड, उसनवार, धार्मिक कार्य.. अनेक कारणं आहेत, ज्याला पैसा लागतो आणि गरजेला वेळेवर पैसा मिळत नाही. जवळचे सोने विकून पैसा उभारणे हाच एकमेव मार्ग थोडक्यात भविष्यकाळातील  गरज भागवता यावी यासाठी लोक सोने खरेदी करुन ठेवतात.  शेवटी काय - जीवनाच्या समरप्रसंगात वाईट अनुभवांनी व्यक्ती पोळलेली असते. अडचणीला सगळे पाठ फिरवतात. संकटातून तर तरुन जायचं असतं मग काय, एकतर सगळा हवाला देवावर आणि हक्काच्या सोन्यावर वेळ आली की माणसाला परिस्थिती काय काय करायला लावेल ते काही सांगता येत नाही. कारण कोणतंही असो, 'सोनं' ही त्या कुटुंबाची आर्थिक स्तर दर्शवणारी  आपतकालीन स्थितीत दिलासा देणारी एकमेव वस्तू आहे, यात काही शंका नाही.  आपण ज्या काळात वावरतोय तो काळ माहिती तंत्रज्ञानामुळे स्थित्य...