Posts

Showing posts from June, 2022

लेखांक अकरावा : “बदलेगा रंग जमाना पर तुम नहीं बदलना”

Image
एका हिंदी गाण्याची ओळ मला आठवली “बदलेगा रंग जमाना पर तुम नहीं बदलना” प्रेयसीचा आशावाद छान आहे पण त्यापलीकडे जाऊन मला वाटतं की अशा कल्पनेत स्वप्नरंजनात गुंतुन राहण्यापेक्षा “रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा" हे जास्त समर्पक ठरावे. बदल अपरिहार्य आहे म्हणून सर्व प्रसंगातून जाऊन 'मी' जरा वेगळा ठरेन, मी लवचिक होईन.  जीवशास्त्रात 'अमिबा' जसा आकार बदलतो तसं आपण 'मोल्ड' व्हायचं. सरडयासारखं रंग बदलणं मला अपेक्षित नाही . आमच्या विको उद्योगसमूहाला ६५ वर्ष झालीत . आजोबांपासून आम्ही आयुर्वेदिक औषधांचाच पाठपुरावा केला. उत्पादनांची गुणवत्ता तशीच ठेवली. ग्राहकवर्गाच्या गरजांनुसार फेरबदल केले पण निष्ठा, सचोटी सोडली नाही. म्हणूनच आजवरच्या प्रवासात लक्ष्मी सरस्वती' सोबत राहिल्या. घामाचा एक सुगंध असतो. मी १९८६ पासून संचालकपदी आलो पण आमची परिस्थिती 'आगे दुकान पिछे मकान' अशा स्वरुपाची होती.  फॅक्टरी पण तिथेच घर पण तिथेच त्यामुळे कष्टाची सवय होती. सर्वच काम करायचे आणि या सर्वांचा परिणाम असा झाला की 'घामाचा वास' माझ्या नाकात डिओप्रमाणे भरुन राहिला. घरातच इतक...

लेखांक दहावा : जैसा देश वैसा भेस

Image
गीतेमध्ये भगवंताने 'स्थितप्रज्ञ' म्हणून एक संज्ञा योजिली आहे. कोणत्याही प्रसंगात ज्याचे चित्त समतोल राहते असा पुरुष अथवा स्त्री स्थितप्रज्ञ म्हणून ओळखावी. यासाठी फार मोठी साधना लागते.  लक्ष्मीचा सहवास अत्यंत रम्य वाटतो. तिचा वियोग भल्याभल्यांना गुडघे टेकायला लावतो ही खरी 'स्वत्व परीक्षा' असते. गरीबी काय असते ? दारिद्रय म्हणजे काय ? हे अनुभवल्याशिवाय कळत नाही कारण परदुःख शीतल असते.  'दारिद्रय मरण यातुनि मरण बरे बा दरिद्रता खोटी मरणात दु:ख थोडे दारिद्रयात व्यथा असे मोठी।'  या काव्यपंक्तीत अखिल जगताचे दु:ख सामावलले आहे. कडक उन्हानंतर सावली जितकी सुखप्रद वाटते तितकंच सावली नंतरचं ऊन तितकंच तापदायक नकोसं वाटतं ही असळयता कोणालाच नको असते. पण कालचक्रात आपण सापडतोच सापडतो. मला सांगा दु:ख, त्रास, अपमान कोणाला हवे आहेत ? एक कुंती सोडली तर सर्वांनीच भगवंताकडे सुखाची मागणी केलीय. कलीयुगात सर्व पैशाभोवती केंद्रित झाल्याने क्षणभंगुर सुख हवेहवेसे वाटते.  'जैसा देश वैसा भेस' असे मानणारा मी आहे.  एकदा आपल्या स्वानुभवावरुन आणि इतरांच्या अनुभवावरुन जगरहाटी समजली की आपणही क...

लेखांक नववा : आता तुला साध्या सरकीच्या बियांचा त्रास होतोय

Image
मला स्वत:ला प्रवासाची. वाचनाची, लोकांशी संवाद साधण्याची अत्यंत आवड आहे घराविषयी मला ममत्व असते. तरी 'घरा'बाहेर काय चाललंय, हे जाणून घ्यायला मी अत्यंत उत्सुक असतो. माझ्या घरटयाबाहेर आज होणारं वादळ उद्या माझ्या दरवाज्यावर 'दत्त' म्हणून उभं ठाकणारच आहे . बाहय बदलांकडे मी अलिप्तपणे पाहतो आणि अत्यंत सकरात्मकतेने स्वीकारतो. माझ्या ५० वर्षांच्या आयुष्यात मी चढ-उतार पाहिले, टक्के टोणपे खाल्ले आणि या भट्टीतून तावून सुलाखून बाहेर पडलो. प्रत्येकाला या प्रक्रियेतून जावेच लागते. आपल्या आयुष्याचे ५ किंवा १० वर्षांचे टप्पे केले आणि सिंहावलोकन केले तर आपलं 'मूल्यांकन' आपणच करु शकतो.  मध्यंतरी वाचनात आलेली शाहू महाराजांच्या बाबतीतली एक कथा आठवते. शाहू महाराज एकदा उन्हाळयात भर दुपारी फिरायला बाहेर पडले. त्यांची घोडागाडी माळावर पोहोचली. तेथे एक धनगर रखरखत्या उन्हातही उशाखाली धोंडा घेऊन निवांत झोपला होतो. महाराजांना त्याची दया आली. त्यांनी त्याला उठवलं. आपल्या घोडागाडीत घेतलं. राजवाडयावर आणलं. पाहुणचारासाठी ८ दिवस थांबण्याविषयी सांगितलं. त्याला सजवलेली छान खोली दिली. जेवायला सुग्रा...

लेखांक आठवा : सुंदर माझ्या घरा'चे स्वप्न

Image
मध्यंतरी एका लग्नाला गेलो होतो. मंगलाष्टकातला 'सावधान' हा शब्द कानात सारखा घुमत राहिला. केवळ वधूवरांनीच नव्हे तर सर्वांनीच अखंड सावधान राहायला हवे. साडी घेतानासुध्दा स्त्री दहा दुकानात फिरते. मग आर्थिक बाबतीत कोणा एकाच्या सांगण्यावरुन आपण गुंतवणुक करतो. प्रलोभनात अडकतो आणि फसतो. जाहिरातींना भुलो, सत्यासत्यता पाहत नाही. असा पडताळा न घेतल्यानेहोणाऱ्या फसवणुकीला मग जबाबदार कोण ?  थोडक्यात आपण सर्वांनी दक्षतेने कोणतीही गोष्ट करायला हवी. Precaution is better than Cure ! मिळकतीच्या बाबतीत तर जास्त दक्ष रहावे लागते. कारण पैसे येण्याचा मार्गएकच असतो पणखर्चासाठी वाटा हजार असतात. हा प्रत्येकाचा अनुभव. बऱ्याचदा एखाद्या स्वप्नासाठी आपण काही भाग बाजूला काढतो ण अशी काही परिस्थिती निर्माण होत की ती रक्कम तिकडे वळवावी लागते. त्यामुळे अशा गोष्टी कायम घडणारच याची मनाची तयारी असायला हवी. कारण आयुष्य सरळसोपं नाही.  स्तांचा, विचारवंतांचा माझ्यावर फार पगडा आहे, कारण जीवनाचा अर्थ त्यांना कळलाय प्रपंचात राहूनही अनेकांनी खऱ्या अर्थाने जीवन सार्थ केलंय एक आदर्श निर्माण केलाय. आजकाल जगण्याचे संदर्भ बदलल...

लेखांक सातवा : आवश्यकता आहे ती तुमच्या सजगतेची !

Image
एक स्त्री शिक्षित झाली की पूर्ण कुटुंब शिक्षित होते, असे महात्मा फुले म्हणायचे. पुस्तकी शिक्षणाच्या बाहेर जाऊन स्त्रीने आर्थिक बाबींचा विचार करायला हवा. कारण स्त्री ही घराचा आधारस्तंभ असते महत्वाच्या निर्णय प्रक्रियेत तिचे मत आवश्यक आहे. मुलांवर संस्कारांची जबाबदारी तिची असते. निसर्गानेही स्त्रीलाच काही गुण बहाल करुन संगोपनाची जबाबदारी तिच्यावर टाकली आहे . वेदकाळात स्त्रिया सक्षम होत्या. त्या स्वउन्नत्तीकरिता धडपड करायच्या, त्याला समाजमान्यता होती.  देशाचा मधला काळ सामाजिक परिस्थितीने गढूळ झाला आणि सर्वप्रथम बंधने आली ती स्त्रियांवर ! परंतु आता तिला 'या' स्वातंत्र्यासाठी झगडावे लागत नाही. प्रत्येक देश, काल, परिस्थिती भिन्न असते आणि त्यानुसार प्रत्येकालाच संघर्ष करावा लागतो. अगदी रामानेही वनवास भोगला तिथे आपण कोण ?  आपल्याला आर्थिकदृष्टया स्वावलंबी व्हायचे आहे. देशाची परिस्थिती पाहता काहीतरी 'जादू' होईल आणि सर्व आलबेल होईल या भ्रमात कोणीही राहू नये.  आपण आपला विकास करताना आपोआप देशाच्या विकासास हातभार लावू शकतो. हा 'रामसेतू' आहे. प्रत्येकाने खारीचा वाटा उचलला की ...

लेखांक सहावा : कष्टाचे 'बाळकडू'

Image
स्त्रियांच्या अष्टावधानी स्वभावाने मी नेहमीच प्रभावित होतो. आर्थिक बाबतीत पुरुषांच्या बरोरीने स्त्रियाही असतील तर त्या कुटुंबाचीच नव्हे तर समाजाचीही आर्थक उन्नती होईल. दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा आपण सक्षम असलेले केव्हाही बरे नाही का ?  अनेकदा सकारात्मक विचारांपेक्षा नकारात्मक विचारांचा पगडा मनावर असतो. आपल्याला एका रात्रीत मोठं होता येणार नाही आपलजी वाढ हळूहळू होणार आहे. हे सर्वप्रथम लक्षात ठेवावं 'ससा आणि कारव' या गोष्टीतला कासव आपण होणार आहोत आणि 'Slow and Steady Wins the Race !' हे तत्व अवलंबवणार आहोत.  किमान काही शिक्षण आणि जगाचा थोडाबहुत अनुभव आपल्यासाठी पुरेसा आहे. एका मध्यमवर्गीय चौकोनी कुटुंबातील स्त्रीने केवळ घरात न बसता आपल्या क्षमतेचा उपयोग करुन आर्थिक सुधारण घडवून आणायला हवी. केवळ आर्थिक स्तर उंचावला म्हणजे आपण काही मिळवलं असं नाही तर याद्वारे आपण एक पायंडा पाडणार आहोत.  याचे फायदे कोणकोणते होतील ? पतीला आर्थिक आधार मिळेल. महिन्याची दोन टोकं जुळविण्यात वाया जाणारे 'अनमोल क्षण' आपण आपल्याठी व्यतीत करु शकतो. शिवाय स्वावलंबनाने आणि मिळणाऱ्या पैशाने...

लेखांक पाचवा : 'चूल आणि मूल'

Image
पूर्वीच्या बायका म्हणत 'नवऱ्याने भाकरीचे पाठ मिळवले तर बाईने मीठ मिळवावे'. किती उदात्त विचारसरणी होती! 'चूल आणि मूल' इतपतच स्त्रिया काही करु शकत होत्या. शिक्षणाचा गंध नाही. आजच्यासारखी परिस्थिती खचितच तेव्हा नव्हती, तरीदेखील प्रपंचासाठी काही करण्याची त्यांची उर्मी फार काही सांगून जाते.  मी स्त्रीला आदिशक्तीच्या रुपात मानतो, पाहतो. मला स्त्रियांविषयी अत्यंत आदर आहे. स्त्रियांच्या, कष्टामुळे सहनशक्तीमुळे खंबीरपणाने किती आधार मिळतोहे मी स्वत: अनुभवलेले आहे. पुरुषाने कमवायचे आणि स्त्रीने त्याचे जतन करायचे यापुढे पाऊल टाकून स्त्रीनेही पुरुषाच्या बरोबरीने कमवायचे हा आजच्या काळातला समाजमान्य विचार ! याबद्दल दुमत नाही. स्त्रीच्या कर्तृत्वाला मर्यादा नाहीत म्हणूनच आर्थिक बाबतीतले तिचे स्वातंत्र्य तिच्यासाठी, तिच्या घरासाठी आणि सबंध समाजासाठी विशेष महत्वाचे ठरते.  कष्टकरी स्त्री असो वा एखाद्या कॉर्पोरेट ऑफिसमधील उच्चशिक्षित उच्च पदस्थ स्त्री असो, दोघीही आर्थिक बाबतीतले नियाजन अतिशय काटेकोरपणे करतात-पाळतात.  मधमाश्यांच्या पोळयात एक 'राणी माशी' असते आणि इतर कामकरी माश्या वि...

लेखांक चौथा : 'चित्ती असो द्यावे समाधान ।'

Image
माझ्या मनावर लहानपणीची एक हिंदी कविता कायम घर करुन आहे.  “लहरोंसे डरकर नौका पार नहीं होती। कोशिश करनेवालोंकी कभी हार नहीं होती।।"  आर्थिक स्तर उंचावण्यासाठी तुमचे सातत्याने प्रयत्न असले पाहिजेत. एका रात्रीत श्रीमंत होण्याची स्वप्ने सगळयांची पूर्ण होऊ शकत नाहीत. आपण प्रयत्नवादी राहिले पाहिजे. स्वकष्टाने मिळवलेला पैसा शांत झोप दोते. अनितीने मिळवलेली लक्ष्मी टिकतही नाही आणि लोभतही नाही. या सर्व विवेचनाचे कारण असे की पैसा मिळवणे हे प्रत्येकाचे उद्दिष्ट असावे पण त्याचा मार्ग 'राजमार्ग' असावा. झटपट असं आयुष्यात काहीच मिळत नसतं. परमेश्वर तुमची परीक्षा घेतो. तुमचा संयम, चिकाटी, मेहनत यात तुम्ही पासझालात की लक्ष्मी आनंदाने येते.  अर्थनीती संदर्भात आपण व्यापक विचार करायला हवा. 'मी' आणि 'माझे कुटुंब' हाच दृष्टिकोन न ठेवता त्याही पुढे जाऊन 'वसुधैव कुटुंबकम्' अशी वृत्ती वर्णिस लागली पाहिजे. व्यवसायातून अथवा नोकरीतून मिळणारा पैसा हा आपल्या स्वत:साठी, घरासाठी खर्च करावाच पण समाजऋण फेडण्यासाठी आपण काही रक्कम वेगळी ठेवायला हवी.  आपण आपल्या उदाहरणातून दुसऱ्यांसमोर ...

लेखांक तिसरा : पळसाला पाने तीनच !

Image
  आपल्या पूर्वजांनी किंवा आधीच्या पिढीने फार विचारपूर्वक काही गोष्टी म्हणींच्या रुपात आपल्याला वारसा म्हणून दिलेल्या आहेत. कालबाहय म्हणून त्या टाकून न देता कालानुरुप योग्य ते बदल करुन त्याचे सुधारित स्वरुप निश्चितच आपल्याला जीवनात आनंद निर्माण करु शकेल. पैशांची समस्या नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. कोणत्या ना कोणत्या स्वरुपात 'अर्थ' समस्या भेडसावत असतेच असते. व्यक्तिंनुसार तिची तीव्रता बदलेल पण समस्या ही असणारच ! पळसाला पाने तीनच ! (मोठी असतील छोटी असतील पण पाने तीनच).  थोडक्यात धनसंपत्तीबद्दल म्हणायचं झालं तर “थोडा है थोडे की जरुरत है।” असं प्रत्येकाला वाटतंच वाटतं. किती मिळालं तरी समाधान होत नाही उलट हवंहवंसं वाटणारं हे जगातलं एकमेव 'अर्थ' शास्त्र ! या 'अर्था' ने जीवनाला कधी 'अर्थ' मिळतो तर कधी 'अनर्थ'ही होतो. आपल्याला या 'सुंदर' जगण्याला अर्थपूर्ण करायचं आहे . शून्यातून जग निर्माण करणाऱ्यांनी किंवा इतिहास घडविणाऱ्यांच्या आयुष्याकडे नजर टाकली तर अनेक समस्यांना भिडत त्यांनी आपला 'नवा' मार्ग चोखाळला की ज्याने त्यांनाही अचं...

लेखांक दूसरा : 'सबसे बड़ा रुपय्या'

Image
'सबसे बड़ा रुपय्या' म्हणणाऱ्या या युगात आपल्याला रहायचे आहे. सबंध / संपूर्ण आयुष्य पैशाभोवती फिरु लागल्यामुळे लक्ष्मीप्राप्तीसाठी अनेक मार्गांचा अवलंब केला जातो. पण लक्षात ठेवा सचोटी, श्रमाने मिळवलेले धन कायम टिकते, त्यात वृध्दी होते. लक्ष्मी चंचल असते म्हणून तिचा कायमचा वास राहण्यसाठी प्रत्येकाने तिचा आदर करायला शिकलं पाहिजे.  जोडोनि धन उत्तम वेव्हारे। उदासपणे खर्च करी।। असे तुकोबा म्हणतात, त्यामागे मर्म हेच आहे . व्यवस्थापनशास्त्राचा कोणताही अभ्यासक्रम पूर्ण न करणाऱ्या अडाणी व्यक्तीदेखील आपलं गृहखातं व्यवस्थित सांभाळतात. काटकसरी वृत्तीने पैसा सांभाळला तर आपोआप धनसंचय होत असतो.  आर्थिक दृष्टीकोनातून समाजातील वर्ग विचार केला तर कनिष्ठ-मध्य-उच्च वर्गांचा समावेश होत असतो. या सर्वांकडे कमी अधिक प्रमाणात पैसा असतो. आपला आर्थिक स्तर उंच असावा असे प्रत्येकाला वाटते आणि त्यात गैर काही नाही. आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत. आर्थिक नियोजन योग्य असेल तर काही काळात आपण आपले ईप्सित ध्येय गाठू शकतो. आपण कोणत्या वर्गात मोडतो ? म्हणजेच आपण (पॅक्टीकल) वास्तव परिस्थिती स्...

1 लक्ष्मीचे पूजन आणि संवर्धन

Image
काडी काडी जमवून पक्षी घरटं बांधतात आणि आपला काळ सुखाने घालवतात. आपण तर मनुष्यप्राणी विकसित मेंदू लाभलेला निसर्गाचं वरदानच जणू ! त्यालाही एक सुंदर घर असतं  आणि तद्नुषंगानं 'घराची समीकरणं' सोडवण्यात प्रत्येकाचंच आयुष्य व्यतित होतं . लक्ष्मी, पैसा अर्थात 'अर्थ' याला जीवनात फार महत्वाचे स्थान आहे. कसोटी पाहणारा, गोंधळवून टाकणारा हा पैसा असला तरी समस्या आणि नसला तर त्याहून अधिक समस्या !  अर्थप्राप्ती जशी कष्टप्रद असते त्यापेक्षा तिची योग्य गुंतवणुक जास्त कष्टप्रद ! लक्ष्मीचा सहवास सर्वांना हवाहवासा वाटतो, तिला नाकारणारा एखादाच कपाळकरंटा !  मेळविती तितुके भक्षिती। ते कठिण काळी मरोन जाती।। असे श्री समर्थांनी दासबोधात म्हटलेच आहे. थोडक्यात जे काही प्राप्त कराल त्यातील अल्पस्वल्प भविष्याच्या दृष्टीने साठवून ठेवावे लागते. पावसाळयाच्या तोंडावर मुंगीसारख्या यःकश्चित प्राणीही अन्नधान्याचा साठा करतो. आपण तर काय बुध्दीचे वरदान मिळालेले निसर्गातले सर्वश्रेष्ठ !  आपण किती जगणार ? म्हणजे आर्युमर्यादा किती ? हे कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही. म्हणून जोपर्यंत देह आहे तोपर्यंत त्याच्या...